आदिवासी विद्यार्थ्यांच्या सामाजिक व भावनिक बुद्धिमत्तेचा विकास: शालेय आव्हाने, संधी आणि दिशा

Authors

  • मनोहर रामदास धामणे, डॉ. गजानन मुरलीधर खेकाडे Author

DOI:

https://doi.org/10.7492/ktbn1b08

Abstract

आदिवासी विद्यार्थ्यांच्या सामाजिक व भावनिक बुद्धिमत्तेच्या विकासावर आधारित या संशोधन पेपरमध्ये त्यांच्या शालेय जीवनात येणारी विविध आव्हाने, संधी आणि त्यासाठी आवश्यक दिशा यांचा सखोल विचार केला आहे. भारतातील आदिवासी विद्यार्थी शालेय शिक्षणामध्ये अनेक सामाजिक, सांस्कृतिक, आणि मानसिक अडचणींचा सामना करत आहेत. त्यांच्या पंरपरागत जीवनशैली आणि शिक्षणाच्या पारंपारिक पद्धतींमध्ये तफावत असल्याने, अनेकदा त्यांना शालेय वातावरणात समावेश होण्यास आणि त्यांची भावनिक आणि सामाजिक बुद्धिमत्ता विकसित करण्यास अडचणी येतात. आदिवासी विद्यार्थ्यांना शाळेतून बाहेर पडण्याची कारणे विविध असतात, जसे की सांस्कृतिक ओळख, भाषा समस्या, कमी आर्थिक संसाधने, आणि शिक्षणातील गुणवत्तेची कमतरता. यामुळे ते भावनिकदृष्ट्या असुरक्षित आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेले वाटतात. याचा परिणाम त्यांच्या शालेय प्रदर्शनावर आणि भविष्यकालीन विकासावर होतो. योग्य शालेय वातावरण, जिथे त्यांचे सांस्कृतिक मूल्य आणि आदिवासी ओळख जपली जाते, त्या ठिकाणी त्यांच्या सामाजिक व भावनिक बुद्धिमत्तेचा विकास होऊ शकतो. शिक्षकांच्या संवेदनशीलतेची आणि मार्गदर्शनाची मोठी भूमिका आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना आत्मविश्वास मिळतो आणि ते शालेय जीवनात यशस्वी होतात. आदिवासी विद्यार्थ्यांच्या भावनिक आणि सामाजिक बुद्धिमत्तेच्या विकासासाठी शालेय व्यवस्थेत काही सुधारणा, जसे की मनोवैज्ञानिक मदतीचा समावेश, सामाजिक समावेशाचे पाऊल, आणि त्यांचे पारंपारिक ज्ञान आणि अनुभव शाळेच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करणे आवश्यक आहे. शालेय स्तरावर संधी निर्माण करणे आणि विविध कौशल्ये आणि मानसशास्त्रीय पद्धती लागू करणे यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांचे शालेय जीवन अधिक समृद्ध आणि समर्थ होऊ शकते. यामध्ये शिक्षक, पालक, समुदाय आणि शालेय धोरणांचा समन्वय अत्यंत महत्त्वाचा आहे. यामुळे ते त्यांचा सामाजिक आणि भावनिक विकास साधू शकतात, आणि शिक्षणाच्या क्षेत्रात समानता प्राप्त करु शकतात.

Downloads

Published

2011-2025

Issue

Section

Articles