पाडळसरे धरणाच्या विलंबाने पूर्ण होण्याचे आर्थिक परिणाम: जळगाव जिल्ह्यातील निम्न तापी प्रकल्पाचा एक अभ्यास

Authors

  • 1. कु. मनीषा राजेंद्र पारधी , 2. प्रा. डॉ. हर्षवर्धन दामोदर जाधव Author

DOI:

https://doi.org/10.7492/2etb0t81

Abstract

पाडळसरे धरण हे जळगाव जिल्ह्यातील निम्न तापी प्रकल्पाचा एक महत्त्वाचा भाग आहे. हा प्रकल्प शेतीसाठी पाणीपुरवठा, पेयजल आणि जलविद्युत निर्मितीसाठी महत्त्वाचा आहे. मात्र, निधीअभावी, तांत्रिक अडचणी, जमीन संपादनातील विलंब आणि प्रशासनिक कारणांमुळे प्रकल्पाच्या पूर्ण होण्यास विलंब झाला आहे.

या संशोधनात पाडळसरे धरणाच्या विलंबामुळे उद्भवलेल्या आर्थिक परिणामांचा अभ्यास करण्यात आला आहे. प्राथमिक आणि दुय्यम माहितीच्या आधारे हा विश्लेषणात्मक अभ्यास करण्यात आला. यामध्ये प्रकल्पाच्या उशिरामुळे कृषी उत्पादनावर झालेला परिणाम, सिंचन क्षमतेतील घट, गुंतवणुकीवरील परतावा (ROI), स्थानिक अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम आणि सरकारी खर्चातील वाढ यांचा सविस्तर आढावा घेतला आहे.

Downloads

Published

2011-2025