शाळासिद्धी कार्यक्रमाचा शालेय गुणवत्ता विकासावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास
DOI:
https://doi.org/10.7492/vdgph350Abstract
प्रस्तुत संशोधनात सर्व बालकांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी परिणामकारक शाळा व सुधारणात्मक शालेय कामगिरी यांची वाढती गरज लक्षात घेता शालेय स्तरावरची शिक्षणाची मानके,बलस्थाने सुधारण्यासाठी शाळासिद्धी हा राष्ट्रीय शैक्षणिक कार्यक्रम भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या वतीने राबविण्यात येत आहे.सर्वंकष शालेय गुणवत्तेच्या दृष्टिकोनातून शाळासिद्धी कार्यक्रमात शिक्षण व शाळा विकासाची क्षेत्रे,गाभा-मानके देण्यात आलेली आहेत, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा विकासाची क्षेत्रे व त्यातील गाभा मानके यांचा सर्वेक्षणात्मक अभ्यास करण्यात आला,प्रस्तुत संशोधनामुळे जळगाव जिल्ह्यामधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील शाळासिद्धी कार्यक्रमाची सर्वंकष शालेय गुणवत्तेची सद्यस्थिती व शाळासिद्धी कार्यक्रमाचा शालेय गुणवत्ता विकासावर होणारा परिणाम दिसून आला.