निपुण भारत अभियाना मधील पूरक शैक्षणिक साहित्य संचाचा विद्यार्थ्यांच्या गणिताच्या संपादनुकीवर होणाऱ्या परिणामकारकतेचा अभ्यास
DOI:
https://doi.org/10.7492/rw73k619Keywords:
पूरक शैक्षणिक साहित्य संच, शैक्षणिक संपादनAbstract
गणित हे सर्वव्यापी असे शास्त्र आहे. गणित हा विषय जीवनाला व्यापून टाकणारा विषय आहे, म्हणून रॉजर बेकन यांनी गणिताला सर्व शास्त्रांचे प्रवेशद्वार असे म्हटले आहे. मात्र तरीसुद्धा आपण पाहतो की गणिताविषयी अनाठही असणारे भीती विद्यार्थ्यांच्या मनात बसली आहे त्यामुळे विद्यार्थी गणितापासून दूर जाताना आपल्याला दिसतात. गणितासारख्या महत्त्वपूर्ण अशा विषयांमध्ये विद्यार्थी मागे पडत आहेत. असर, प्रथम यांसारख्या विविध प्रकारच्या एनजीओ संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार विद्यार्थ्यांचे गणितातील संपादनूक निम्न दर्जाचे असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे गणितामधील संपादन वाढवण्यासाठी विशेष करून असे प्रयत्न करणे गरजेचे आहे, त्यासाठी शासनाचे एक पाऊल म्हणजे निपुण भारत अभियान होय. या अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची गणितातील प्रगती होण्यास निश्चितच भर पडणार आहे.